अमळनेर : वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे खुर्द येथील महिला शेतकरी गटांनी पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि कौतुकास्पद संदेश दिला आहे. या महिलांनी एकत्र येत तब्बल ३० वटवृक्षांची लागवड केली असून, केवळ वृक्षलागवडच नाही, तर या वृक्षांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारीही स्वतः स्वीकारली आहे.

