अमळनेर : शहरात झालेल्या अवघ्या एक तासाच्या रिमझिम (रीप-रीप) पावसाने नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व नियोजनाची पोलखोल केली आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते आणि कॉलनी परिसरातील गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळेच नाल्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याच्या तीव्र तक्रारी स्थानिक नागरिकांमधून केल्या जात आहेत.

