अमळनेर : येथील प्रसिद्ध श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. टेकडी परिसरात क्लोरीन वायूचा वापर केला जात असताना झालेल्या अचानक तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे ९०० किलो क्लोरीन वायूची गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.

