अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथे आज, मंगळवार दि. २३ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निसर्गाचा थरार पाहायला मिळाला. शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी पावसात वीज कोसळल्याने राकेश रतिलाल पाटील (वय ३२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या डोळ्यांदेखतच मुलावर काळाने झडप घातल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

