खा. शि. मं. संचलित श्रीमती द्रौपदीबाई कन्या शाळेत ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस’ उत्साहात साजरा!

अमळनेर : येथील नामवंत खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत २३ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस’ मोठ्या उत्साहात आणि क्रीडामय वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात देशासाठी ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडावेत, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रीडा साहित्याचे पूजन आणि मशाल प्रज्वलन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते व भारतीय क्रीडा जगताचे मानबिंदू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे पूजन व पारंपारिक ऑलिम्पिक मशालीचे प्रज्वलन करून क्रीडा उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी माधुरी राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले मॅडम, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. बाविस्कर आणि श्रीमती एस. एस. देवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

‘हलका, शिका आणि शोधा’ या तीन स्तंभांवर आधारित ऑलिम्पिक दिन

ऑलिम्पिक दिवसाचे महत्त्व सांगताना मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम म्हणाल्या की,“पहिला ऑलिम्पिक दिवस २३ जून १९४८ रोजी साजरा करण्यात आला होता. जगातील ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. जगात खेळाचे महत्त्व वाढावे आणि सर्व जगाने गुण्यागोविंदाने राहावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ऑलिम्पिक दिन प्रामुख्याने ‘हलका, शिका आणि शोधा’ (Move, Learn and Discover) या तीन स्तंभांवर आधारित आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, ही स्पर्धा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देते आणि दैनंदिन व्यायामाचे महत्त्व पटवून देते. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत आणि भविष्यात भारताने ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके जिंकावीत, यासाठी विद्यार्थिनींनी मैदानी खेळांमध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे.

मैदानी स्पर्धा आणि खेळाडूंनी घेतली सामूहिक शपथ

या दिनाचे औचित्य साधून शाळेत ‘जंप रोप’ (दोरउडी) आणि ‘धावणे’ या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून विद्यार्थिनींमध्ये क्रीडा भावना, आपुलकी आणि आपली संस्कृती जोपासली जाते, असा संदेश देण्यात आला. आगामी काळात खेळाला सुगीचे दिवस आणण्यासाठी आपण सर्वजण क्रीडा क्षेत्रात योगदान देऊ, अशी सामूहिक शपथ यावेळी सर्व विद्यार्थिनींनी घेतली.

नियोजन व सहकार्य

या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संयोजन आणि नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय समितीचे चेअरमन श्री. जितेंद्रभाऊ जैन यांचे मार्गदर्शन लाभले, तर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!