प्रशांत निकम हे स्टंटबाज, पाणी टाकी स्वच्छतेचा दावा खोटा’; जितेंद्र ठाकूर यांचा पलटवार

अमळनेर:गेल्या २४ वर्षांपासून शहरातील पाणी टाकीच्या स्वच्छता झालेली नसल्याचा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा दावा विरोधी गटाचे जीतेंद्र ठाकूर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. निकम हे निव्वळ “स्टंटबाज” असून स्वतःचे अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल करत असल्याचा घणाघात ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

​मुख्य मुद्दे:

२४ वर्षांचा दावा खोटा: माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या कार्यकाळात (२०११ ते २०१४) शहरातील पाण्याच्या टाकीच्या व्यापक स्वच्छता करण्यात आली होती, त्यामुळे निकम यांचा दावा धादांत खोटा आहे.

​नव्या टाक्यांचे लोकार्पण: २०१४ मध्येच शहरात ५ नवीन पाण्याच्या टाकी चे बांधकाम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण झाले होते, अशी माहिती ठाकूर यांनी पालिकेच्या रेकॉर्डचा हवाला देत दिली.

​मोर्चाच्या भीतीने स्टंट: शहर विकास आघाडीने दूषित पाणी पुरवठ्या विरोधात २२ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या भीती पोटीच निकम यांनी टाकीत उतरून प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट केला.

​राजीनाम्याची मागणी: गेल्या सहा महिन्यांपासून हातात सत्ता असताना विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या उपनगराध्यक्षांनी लोकांच्या जिवाशी खेळणे थांबवून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी जितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!