अमळनेर : “जनतेच्या जीवावर नगरपालिकेत सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे माजी आमदारांचे आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे. अनेक वर्षांनंतर यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरची जनता पाण्यासाठी व्याकुळ झाली असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही,” असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पालिकेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

