गिरीश महाजनांनी आमदार अनिल पाटील यांच्या बाबतचे भाकीत खरं ठरवावे जास्त मताधिक्य मिळाल्यास चांगले खाते मिळणार

 

अमळनेर येथील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमळनेर येथे महायुतीचा मेळावा झाला असता त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल पाटील यांना जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढे चांगले खाते मिळू शकते असे भाकीत केले होते.

अमळनेरच्या जनतेने आता त्यांना 33 हजारांचे मोठे मताधिक्य दिल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची आठवण अमळनेरकराना असून महायुती सरकार आता त्यांना कोणते खाते देणार?असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव आमदार असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.तर आपले भाकीत खरं ठरविण्याची वेळ आली असून मंत्री गिरीष महाजन यांनी त्या अनुषंगाने वचन पुर्ती करावी अशी मागणी अमलनेरकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!