अमळनेर: “प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत संस्कृत भाषेतील साहित्याने मोलाची भर घातली आहे. यात महाकवी कालिदासाचे योगदान अत्यंत मोठे असून, त्यांचे ‘मेघदूत’ हे महाकाव्य त्यांच्या उत्कट प्रतिभेचा अविष्कार आहे,” असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात महाकवी कालिदास दिनानिमित्त “महाकवी कालिदास – जीवन व कार्य” या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.

