अमळनेरमध्ये काँग्रेसचा निर्धार: संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांची एकजूट!

अमळनेर: तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित संघटनात्मक आढावा बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष बंटी भैया पाटील, नितीन सूर्यवंशी, श्रीधर काका आणि वाणी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“अमळनेर काँग्रेसचे काम जिल्ह्यात आदर्शवत असून आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष भालेराव यांनी केले. तसेच, प्रदेश काँग्रेसकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन बंटी भैया पाटील यांनी दिले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:

सत्कार समारंभ: शेतकी संघ निवडणुकीतील विजयी उमेदवार, सत्ताधाऱ्यांविरुद्ध धैर्याने लढलेले कार्यकर्ते आणि नवनियुक्त NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

निवडणुकींचा निर्धार: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा पाटील, सुरेश दादा पाटील, गोकुळ आबा पाटील, तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, प्रा. श्याम पवार, संदीप घोरपडे, किसान काँग्रेसचे प्रा. दिनेश पवार, गिरीश पाटील, प्रताप आबा, भागवत अण्णा, ताराचंद नाना, रोहिदास दाजी, श्रीराम आप्पा, भिवसन बाबा, तुकाराम बापू, प्रमोद पाटील यांच्यासह तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“एकजूट आणि जनसंपर्काच्या बळावर काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा संकल्प” कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!