अमळनेर शहर प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या ‘अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि.’ च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीची (सन २०२५-३०) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता ६ वेगवेगळ्या मतदार संघांतून एकूण ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

या निवडणुकीत एका बाजूला खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील तगडे पॅनल मैदानात उतरले आहे, तर दुसऱ्या बाजूला तालुका काँग्रेस पक्षानेही आपले स्वतंत्र पॅनल उभे केल्याने लढत अत्यंत चुरशीची बनली असून पॅनल प्रमुखांचा कस लागणार आहे.

