जळगावकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि प्रतीक्षित बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली जळगाव विमानतळावरील हवाई सेवा अखेर पुन्हा एकदा झेप घेण्यास सज्ज झाली आहे. अॅलियन्स एअर कंपनीची ‘दिल्ली-इंदूर-जळगाव’ आणि ‘जळगाव-इंदूर-दिल्ली’ ही विमानसेवा येत्या २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे.

महत्त्वाचे तपशील:
सुरुवात: २ मे २०२६ (प्रायोगिक कालावधी ३१ मे पर्यंत)
वार: मंगळवार, गुरुवार आणि शनिवार (आठवड्यातून तीन दिवस)
मार्ग: दिल्ली ➔ इंदूर ➔ जळगाव आणि परतीचा प्रवास.
तिकीट दर: ₹३,००० पासून सुरू (बुकिंग्स सुरू झाले आहेत).
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जलसंपदा मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे सहकार्य आणि आमदार राजूमामा भोळे यांची मागणी यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.
“जळगावच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित विमानसेवा असणे गरजेचे होते. या सेवेमुळे उत्तर भारताशी आपली थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.”
— खासदार स्मिताताई वाघ
