अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार निधीतून मंजूर झालेल्या धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. सुमारे ₹२५ लाख खर्चून होणाऱ्या या कामामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

