दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : न. प. प्रशासनाने तात्काळ लक्ष दयावे अन्यथा आंदोलना सामोरे जावे – सामाजिक कार्यकर्ते नविद शेख 

अमळनेर, येथील शहरात होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा बाबत सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांनी दिला आंदोलनाचा इशारा.

सविस्तर वृत्त की, गेल्या काही दिवसा पासून शहरात पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याचा धोका बळवतो म्हणून सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख यांनी नपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदना द्वारे या समस्यावर त्वरित उपाय योजना नकेल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दूषित पाणी आणि त्याचे दुष्परिणाम :-

1) दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

2) अनेक सूक्ष्मजीव आणि रासायनिक घटक दूषित पाण्यात आढळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. 

3) रोगप्रतिकारशक्ती कमी होणे:दूषित पाणी प्याल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. 

4) पचनसंस्थेचे विकार:दूषित पाण्यामुळे पचनसंस्थेचे विकार, जसे की अतिसार, उलट्या, पोटदुखी इत्यादी होऊ शकतात. 

5) त्वचेचे विकार: दूषित पाण्यामुळे त्वचेचे विकार, जसे की खाज सुटणे, त्वचेला लालसरपणा येणे, केस गळणे इत्यादी समस्या येऊ शकतात. 

6) किडनीचे विकार: दूषित पाण्यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधित इतर समस्या देखील होऊ शकतात. 

7) गंभीर आजार: दूषित पाण्यामुळे गंभीर आजार, जसे की टायफॉइड, कॉलरा, हिपॅटायटीस ए इत्यादी होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!