अमळनेर: गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरातून होणाऱ्या बेसुमार आणि अनियंत्रित वाळू वाहतुकीमुळे संपूर्ण शहर धुळीच्या विळख्यात सापडले आहे. ओव्हरलोड डंपर आणि ट्रॅक्टरमधून उडणाऱ्या वाळू व धुळीमुळे शहरातील मुख्य रस्ते धूसर झाले असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

