महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभाग यांच्यातर्फे सन २०२४ चे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, अमळनेर मधील जेष्ठ पत्रकार तसेच उदयकाळ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बागुल ह्यांचा चिरंजीव युवा लेखक मयूर बागुल यांना प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या ” सर्जक ” या पुस्तकासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय विषयक उत्कृष्ट लेखनाबद्दल एक लाख रुपयांचा ‘वसंतराव नाईक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

