शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवणारे ‘भगीरथ’ माजी केंद्रीय मंत्री ऍड विजय नवल पाटील ‘शिक्षण महर्षी’ पुरस्कारने सन्मानित!……       पोलीस व पत्रकार महोत्सव दिनी मान्यवरांच्या मंदियाळीत दिमाखदार सोहळा संपन्न.

 

​         अमळनेर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात पार पडलेल्या ‘पोलीस व पत्रकार महोत्सव’ दिनाचे औचित्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबंई शाखा अमळनेर यांनी माजी केंद्रीय मंत्री ऍड विजय नवल पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘शिक्षण महर्षी’ पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:

डॉ. विश्वास आरोटे (प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई)

मा दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक)

ओमप्रकाश मुंदडे (प्रसिद्ध उद्योजक, अमळनेर)

डॉ. परीक्षित बाविस्कर (नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष)

सौ जयश्री पाटील (माजी नगराध्यक्षा)

प्रा. शिवाजी पाटील (ज्येष्ठ साहित्यिक तथा निर्भगावलीकार)

सौ रिता बाविस्कर (सामाजिक कार्यकर्त्या)

डॉ. जी. एम. पाटील (वैद्यकीय अधिकारी)

पांडुरंग पाटील (ज्येष्ठ पत्रकार)

जितेंद्र ठाकूर (ज्येष्ठ पत्रकार)

सोहळ्याचे वृत्तांत

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व बाळशात्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

    यावेळी बोलताना डॉ. विश्वास आरोटे यांनी पोलीस आणि पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. विजय नवल पाटील यांनी अमळनेर आणि परिसरात शिक्षणाचे जाळे विणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही पाटील यांच्या कार्याचा गौरव करत शहराच्या विकासात अशा अनुभवी मार्गदर्शकांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

​सत्कारार्थींचे मनोगत

पुरस्काराला उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी आपल्या संघर्षाचा आणि शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. हा सन्मान आपल्याला अधिक सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.​पुढे ते असे म्हणाले की,”जेव्हा राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि पत्रकारिता एकाच व्यासपीठावर येते, तेव्हा समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग प्रशस्त होतो, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. पोलीस आणि पत्रकार यांची सामाजिक बांधिलकी ही उल्लेखनीय आहे. पत्रकार हा समाजमानचा आरसा तर नागरिक आणि शासनां मधील दुवा असतो. पत्रकारिता ही समाजातील अनिष्ठ घटनावर प्रहार करणारी तर चांगल्या गोष्टी प्रकाशात आणण्यासाठी असली पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या वृतपत्राद्वारे सामाजिक अनिष्ठ प्रथेवर आसूड ओढून समाजात अमूलाग्र बदल घडवीला. सत्ता स्थित्यातंरात पत्रकार हा अहम भूमिका बजावत असतो तर पोलीस हा सामाजिक आरोग्य सुदृढ राखण्यात कसोशीने प्रयत्नशील असतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे व प्रसिद्ध विनोद कलाकर विनोद शिरसाट यांनी केले तर आभार प्रा डॉ विजय गाढे यांनी मानले.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने:​डॉ. समाधान मरळे (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग तथा तालुकाध्यक्ष)​प्रा. डॉ. विजय गाढे (खान्देश उपाध्यक्ष)सुरेश ​कांबळे (जिल्हा सरचिटणीस)​यदुवीर पाटील (जिल्हा उपाध्यक्ष)​नूर खान पठाण व प्रवीण बैसाणे (तालुका उपाध्यक्ष)​आत्माराम अहिरे (तालुका संघटक)​हितेंद्र बडगुजर (तालुका कार्याध्यक्ष) गणेश चव्हाण (तालुका प्रसिद्धीप्रमुख)​सुरेंद्र जैन, राहुल भदाणे, रिजवान मनियार, योगेश वाणी, सत्तार खान, किशोर वाणी (तालुका सदस्य)​या सर्व टीमच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पोलीस आणि पत्रकारांच्या या एकत्र येण्यामुळे शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

     ​या कार्यक्रमाला अमळनेर परिसरातील नागरिक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!