अमळनेर येथील रस्त्यात बेशिस्त वाहन लावून अडथळे निर्माण करणाऱ्या वर पोलिसांनी कारवाई करून ठोठावला दंड.

सविस्तर वृत्त की, अमळनेर शहर हे व्यापारी पेठ म्हणून इतिहासात नोंद आहे. तसेच या तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे असल्याने भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. असे असून ही न पा प्रशासनाची शहरात वाहनतळ उभारण्यात बोंबाबोंब आहे. शहरात वाहनतळ उभारावे म्हणून नागरिक मागणी करीत आहे.तालुक्यात येणारे वाहन धारक हे शहराच्या हम रस्त्यात वाहन बेशिस्तपणे लावत असल्याने वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळे निर्माण होत आहे.यामुळे अनेक अपघात होऊन प्रसंगी दोन वाहन चालक यांच्यात विकोपाचे भांडण झाले आहे.त्यातच शहरात मोकाट फिरणारे गुरे ढोरे ही वाहतुकीस अडथळे ठरत आहे. या सर्वा गोष्टीचा बंदोबस्त करावा म्हणून नागरिक मागणी करत आहे.

