मतदारांनी मूळ आदिवासी असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ राधाबाई संजय पवार यानां बहुमताने विजयी करावे –मुकेश साळुंके,प्रदेशाध्यक्ष,आदिवासी पारधी क्रांती संघटना

      अमळनेर येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद प्रथमच अनुसूचित जमाती करीता जाहीर झाल्याने सुरुवातीला स्थानिक राजकारण्या मध्ये नैराश्याचे वातावरण बघायला मिळाले. निवडणुकीत पाहिजे तसा उत्साह दिसून आला नाही.नाईलाजास्तव काना खालचा उमेदवार शोधण्याची धावपळ सुरु झाली होती. यातच शहर विकास आघाडी कडे उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांचा कल दिसला. या स्पर्धेत आघाडीने पत्रकार जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून डॉ परीक्षित बाविस्कर यांना उमेदवारी दिली. तर उबाठा सेने तर्फे सौ शोभा संजय पारधी यांना उमेदवारी दिल्याने तिरंगी लढत होणार आहे.

    दरम्यान,शहरात बहुसंख्य असलेले पारधी व भिल समाजाला उमेदवारी देऊन असली आदिवासी जमातीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन आदिवासी समाजाच्या विविध संघटनानीं मागणी लावून धरली होती.

   आदिवासी पारधी क्रांती संघटनाचे प्रदेशाध्यक्ष मुकेश साळुंके यांनी करडी नजर न्यूज च्या माध्यमातून अमळनेरच्या मतदारांना आवाहन करतांना सांगितले की,आदिवासी मध्ये बळजबरीने घुसखोरी करणाऱ्यांना मतदारांनी मत देऊ नये. मूळ आदिवासी असलेले पारधी समाजातील सौ राधाबाई संजय पवार यानां शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल या चिन्ह वर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे . सामान्य कुटुंबातील असलेल्या राधाबाई संजय पवार यांनी अनेक समाजभिमुख कार्य केलेले आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अविरत झटणारे संजय पवार यांच्या त्या पत्नी आहेत.सौ राधाबाई पवार यांच्या हातून आपल्या अमळनेर शहराचा चांगल्या प्रतीचा विकास आपल्याला हवाय. त्यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या २ तारखेला मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा व लोकशाहिच्या या उत्सहात आदिवासी समाजाला न्याय मिळवून दया, असे आवाहन केले.

    अमळनेरची सुज्ञ मतदार हें कोणाला मतदान देऊन संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!