इच्छुक उमेदवारांना आज नामनिर्देशन अर्ज भरता येणार.. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय.

अमळनेर : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी देखील ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

     १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यालये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. आयोगाने उमेदवारांना विनंती केली आहे की, त्यांनी अंतिम क्षणाची धावपळ टाळण्यासाठी रविवारी अर्ज दाखल करावेत.अर्ज दाखल करण्याची नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.नामनिर्देशन अर्ज आणि मतदार याद्यांच्या वाटपाला वेग आला आहे.

      उमेदवारांनी रविवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्यास शेवटच्या दिवशीची गर्दी टळेल,असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.

  मात्र, बहुतांश उमेदवार १७ नोव्हेंबर या अंतिम दिवशी अर्ज सादर करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण येऊन त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!