शासनाच्या दुष्काळ ग्रस्त यादीत अमळनेर तालुका नसल्याने बाधिताना तात्काळ मदत करा. …. माजी आमदार शिरीष चौधरीचे पालकमंत्र्यांना साकडे 

अमळनेर तालुक्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या दि. १८/१०/२०२५ चा शासन निर्णया मध्ये समावेश नसल्याचे जाहीर होताच मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांची पाळधी येथे निवासस्थानी भेट घेवून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान बाधितांना मदत मिळणे बाबत निवेदन दिले. 

      निवेदनात अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील ३२५३५९ शेतकऱ्यांना २४७२६२.०१ हेक्टर क्षेत्राकरिता रु.२९९९४.४७ लाख इतकी मदत घोषित झाली असून याबाबत सविस्तर माहिती घेतली असता यामध्ये अमळनेर तालुक्याचा कुठेही समावेश करण्यात आलेला नाही.यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकरी हे पूर्णपणे शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की, आपण तात्काळ याबाबतचा सुधारित शासन निर्णय निर्गमित करून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे,अश्या आशयाचे निवेदन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिले आहे.

 पालकमंत्री ना.श्री गुलाबरावजी पाटील यांनी लवकरच अमळनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे.

 प्रसंगी अमळनेर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, किशोर पाटील, रोशन सोनवणे, मा. नगरसेवक अनिल महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!