शासन व्यवस्थेतच लपलेत शेतकऱ्याचे खुनी – गावरानी जागल्या सेना

अमळनेर येथील गावरानी जागल्या सेना चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपसचिव ( पणन ) , मुंबई यांना दिलेल्या पत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकारला कारणीभूत धरून केला घणाघात.

 

सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाने शेतमालाचा वास्तववादी उत्पादन खर्च विचारात घेऊन अभ्यासाअंती निर्धारित केलेल्या दरापेक्षा सुमारे ३० ते ३५ ℅ ( तिस ते पस्तीस टक्के ) कमी असलेले किमान आधारभूत दर ( हमीभाव ) केंद्र शासनाच्या स्तरावरून घोषित केले जातात . केंद्र शासनाने घोषित केलेल्या हमीभावाचे शासकीय शेतमाल खरेदी / मोजणी केंद्र नियमांन्वये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात नियमित व अखंडितपणे योग्य वेळी सुरू न करणेच्या शासन स्तरावरील कार्यपद्धतीमुळे हमीभाव पेक्षा सुमारे १५ ते २० ℅ कमी भावात शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीदारांना किंवा परिसरातील खाजगी व्यापाऱ्यांना विकावयास भाग पाडले जाते . परिणामी शेती हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीपोटी सुमारे ४५ ते ५० ℅ एवढ्या तोट्याचा बोझा एका आर्थिक वर्षातील एकाच हंगामात शेतकऱ्याच्या उरावर बसतो.अतीवृष्टी,अवर्षण,चक्रिवादळ,गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपाई उत्पादनात झालेल्या घटपोटी बसलेला बोझा वेगळाच असतो . परिणामी अशा बोझ्याच्या ओझ्यापाई नैराश्यतेने व हतबलतेने खचून काही कष्टकरी,प्रामाणिक वर्गवारीतील शेतकऱ्यांनी स्वतःस संपवून घेणेच्या अवलंबलेल्या कार्यपद्धतीस शासन स्तरावरून आत्महत्या असे नाव देण्यात आलेले असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नसून शासन व प्रशासनात लपलेल्या शेतकरीद्रोही वृत्तीच्या औलादी व पैदासींनी नियोजनबद्ध पद्धतीच्या आखणीने व कपटाने तो शेतकऱ्यांचा केलेला खून आहे असे गावरानी जागल्या सेना अध्यक्ष तथा सत्यशोधक विश्वासराव पाटील रा. जानवे यांनी उपसचिव ( पणन ) , मुंबई यांना दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे .

शेतकऱ्यांचा खून करणाऱ्या या खूनीं अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील हि बाब देखील पत्रात नमूद केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!