अमळनेर येथे ‘सामाजिक परिवर्तनात कामगारांचे योगदान’ विषयावर जाहीर प्रबोधन सभा

     अमळनेर : येथील रेल्वे स्टेशन परिसरातील हॉलीबॉल ग्राऊंडवर रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता एका भव्य ‘जाहीर प्रबोधन सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन (शाखा अमळनेर) यांच्या वतीने आयोजित या सभेचा मुख्य विषय ‘सामाजिक परिवर्तनात कामगारांचे योगदान’ असा आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा:

उद्घाटक: मा. दर्शना पवार (लेखक आणि प्रशिक्षक – सचिव, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक)

अध्यक्षता: मा. चंपाराम रेंगर (मंडळ अध्यक्ष – SC/ST असोसिएशन)

प्रमुख वक्ते: मा. प्रा. नितीन पाटील (इंग्रजी विभाग, प्रताप महाविद्यालय) आणि मा. प्रेमकुमार गेडाम (राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद)

प्रमुख उपस्थिती:

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. विजय जगताप, मा. अनिल पी. आर. (कामगार कल्याण अधिकारी), मा. डॉ. विवेक अहिरे, मा. राधेश्याम मीना, मा. महेश पुरी गोस्वामी, मा. लखनलाल मीना आणि मा. दयाशंकर पिपरिया यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच रेल्वे विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, अमळनेर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या प्रबोधन सभेस सर्व नागरिकांनी व कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!