मिया वाकी घनवन प्रकल्प हाच खरा शाश्वत विकास*-*डॉ.सचिन नांद्रे

      पारोळा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या माध्यमातून दिनांक ०७ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव टेहू येथे घेण्यात आले.

      शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त अभियान जनजागृती, तसेच एच आय व्ही एड्स जनजागृती व मार्गदर्शन टेस्ट, टी बी मुक्त भारत विविध रक्तगट तपासणी यासह ग्रामीण विकास, पाणलोट व्यवस्थापन, जल जनजागृती, रस्ता सुरक्षा मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन,आरोग्य तपासणी यासह अनेक विविध उपक्रम राबवले.

      शिबिराच्या समारोप प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी संचालक डॉ. सचिन नांद्रे हे उपस्थित होते डॉ. सचिन नांद्रे यांनी मिया वा की घनवन प्रकल्प याची पाहणी केली. याशिवाय टेहू ग्राम स्वच्छता अभियान याचेही अवलोकन केलं समारोपा प्रसंगी त्यांनी सांगितलं की आज च्या या प्रदूषण युक्त जगामध्ये मानवाला समाजाला प्रदूषणमुक्त जगायचं असेल तर आपण वृक्ष लागवड केली पाहिजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त असेल आणि टेहू येथील मी या वाकी प्रकल्प पाहून हाच खरा शाश्वत विकास आहे हे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

    या समारोपा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हीआर पाटील संस्थेचे संचालक एडवोकेट रोहन मोरे टेहू येथील सरपंच सौ. लीना मनोज मोरे, श्री. संभाजी वामन महाले उपसरपंच टेहु सौ.प्रतिभा सोपान पाटील श्रीमती कमलाबाई सखाराम भिल, श्री.भगवान झावरु भिल, ग्रामविकास अधिकारी चेतनकुमार शिवाजी पाटील तसेच महाविद्यालयातील प्रा.डॉ.एस एम पाटील डॉ. एस एन साळुंखे डॉ. एन जे बागुल उपस्थित होते.

    या सात दिवसाच्या शिबिरामध्ये एकूण ११५ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन सातही दिवस श्रमदान विविध मार्गदर्शन पर व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम व्यक्तिमत्त्वाचा विकास या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला स्वयंसेवकांचे सात गट पाडण्यात आले होते प्रत्येक गटाने रोजची संपूर्ण जबाबदारी सदर शिबिरात पार पडली तसेच मेक इन इंडिया या धर्तीवर आधारित टेहू आयटीआय येथील महाविद्यालयाला भेट देऊन विविध पद्धतीचे ट्रेड कसे चालतात नवीन नवीन संशोधन युवक कशा प्रकारे करतात याचीही पाहणी प्राचार्य एन ए पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

     शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मनीष रघुनाथ करंजे डॉ. जितेंद्र सोनवणे, प्राध्यापिका जितूबाई जोगी,जयराम विठ्ठल पाटील, अमोल भाऊ पाटील सचिन मोरे यासह टेहू ग्रामस्थ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन श्रमसंस्कार शिबिर यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!