त्यांना अंमळनेरात दुपारी दोन नंतर मिळणार प्रवेश…पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम 

      अमळनेर,नगरपरिषदेच्या निवडणूक पारश्वभूमीवर पोलीस प्रशासना कडून निवडणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये प्रक्रिया सुरळीत चालावी म्हणून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील काही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

     मागील निवडणुकीत दोन आघाडीतील वाद टोकाला गेला होता व शहरात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. तोच धागा पकडून पोलीस प्रशासन अलर्ट मोड वर आलेले आहे.दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या व त्रासदायक ठरु शकणाऱ्या ४० जणांना २ डिसेंबर पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

     नगरपालिका निवडणूक पार पाडावी व सुव्यवस्था बिघडवू म्हणून गुंड प्रवृत्तीच्या ४० जणांना भारतीय दंड संहिता प्रमाणे ३० नोव्हेंबरपासून तर २ डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत अमळनेर शहरात बंदी घातली असून त्यांना शहराबाहेर पाठवण्यात आले आहे.

   विशेष बाब म्हणजे त्यांनां मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यां ४०जणांना २ रोजी दुपारी दोन वाजेनंतर मतदान करण्यासाठी शहरात प्रवेश करता येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!