बंडखोरी व माघारीकडे अमळनेरकराचे लक्ष लागून….

अमळनेर : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकांचे धावपळ चरमसीमवेर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर आता अंतिम अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली असून, या मुदतीनतंर स्पर्धेत नेमके कोण उमेदवार राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

   अमळनेर मध्ये बंडखौरी,अंतर्गत गटबाजी,माघारी आणि स्थानिक पातळी वरील समीकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहे. राष्ट्रीय स्तरावरील भाजपा पक्षाला योग्य प्रतिनिधित्व नदील्याने कार्यकर्त्यां मध्ये मोठी धुसफूस पहायला मिळते. याचा परिणाम मतदानावर होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरी कडे शहर विकास आघाडी ने संधी नदील्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा मानस केल्याचे दिसते. तर शिंदेच्या शिवसेनेत अनेकांना संधी मिळाल्याने उत्सहाचे वातावरण बघायला मिळते.

     २६ नोव्हेंबरला निवडणुक चिन्ह वाटाप व अंतिम यादी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाईल. प्रत्येक नगरपरिषदे साठी पक्षनिहाय आणि अपक्ष उमेदवारांच्या अंतिम लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

    अमळनेर नगरपालिकामध्ये पक्ष अंतर्गत नाराजी व बंडखोरीचे स्वर वाढले असून काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष रिंगणात उभे राहिल्याने प्रमुख पक्षांसमोर आव्हान उभे राहिले आहे. काही ठिकाणी माघारीची शक्यता असून आज हा दिवस राजकीय घडामोडी साठी निर्णायक ठरणार आहे. अमळनेर मधील सत्तेचे गणित कोण बदलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

   निवडणूक कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व १८ नगरपालिकामध्यें प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व्यवस्था इत्यादी कामांना गती दिली आहे.मतदानानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील.कोणत्या प्रभागा कोण बाजी मारतो, याकडे अंमळनेर च्या नागरिक, पक्षनेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!