जळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी दुपार नंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ४০ ते ५० किलो मिटर ताशी वेगाच्या वाऱ्या सह पाऊस पड़णार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यात विजांच्या कडकड़ाटासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर चक्री वादळमुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उड़ाली असून मोठया प्रमाणात झाडे पड़ल्याने वीज गुल होत असल्याने नागरिकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मान्सुनची सक्रियता आहे मात्र अजुनही पूर्ण ताकदीने मान्सुन परतलेला नाही. ऊन सावली आणि पाऊस यांचे संमिश्र वातावरण पुढ़ील काही दिवसराहणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे.
