कोल्हापूरचे पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनाने 9 मार्चचा मोर्चा रद्द….प्रशांत कोरटकर च्या विरोधातील तक्रार कोल्हापूरच्या गुन्ह्यात समाविष्ट होणार

अमळनेर येथील बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवराय व संभाजी महाराजावर अभद्र वक्तव्य करनाऱ्या कोल्हापूर येथील प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून 9 मार्च रोजी निघणारा मोर्चा कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासन नंतर तूर्त स्थगित.

सविस्तर वृत्त की,छत्रपती शिवराय व संभाजी महाराज यांच्या बाबत अभद्र वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने अमळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. गुन्हा दाखल होत नसल्याने समाज आक्रमक झाला होता. त्यावेळी डिवायएसपी विनायक कोते व प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी बहुजन समाजाला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बोलावल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने शनिवारी रेड्डी यांची भेट घेतली व गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला त्यावेळी रेड्डी यांनी कोल्हापूर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पंडित यांनी अमळनेर ची तक्रार कोल्हापूरच्या गुन्ह्यात समाविष्ट करून घेतो असे आश्वासन दिले आणि मोर्चा न काढण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर येथे दाखल गुन्ह्यात अमळनेर बहुजन समाजाची तक्रार समाविष्ट करून घेतो असे आश्वासन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याने ९ रोजी निघणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
शिष्टमंडळात प्रशांत निकम ,अँड दिनेश पाटील ,मनोहर निकम,महेश पाटील,कैलास पाटील,दीपक काटे, दयाराम पाटील यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!