अमळनेर येथील मनसे कार्यकर्ता व पदाधिकारीच्या वतीने अमळनेर शहरातील भालेराव नगर मधील मुख्य रस्त्यावर पाण्याचा व्हालच्या खड्डयावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटल्याने नागरिकांच्या रहदारीच्या सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झालेला आहे व त्याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही आणि तरी अमळनेर न.प. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र या मुख्य रस्तावरी रहदारीत नागरिक , विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या रहदारीचा वापर मोठ्या प्रमाणात असुन नगर पालिका या कडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज या रस्तावरून हजारो वाहने वापरतात या जालीवरून अवजड वाहन गेल्यावरून सदरची जाळी तुटलेली. तरी दुचाकीवरून जाणारे नागरिक व विद्यार्थी यांना धोका निर्माण झालेला आहे. याकडे मा. प्रशाकीय अधिकारी यांनी सदरच्या खड्ड्यात ताबडतोब जाळी बसवून सहकार्य करावे असे निवेदन देण्यात आल.

निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे मनवि सेना जिल्हा उपाध्यक्ष अरुण गव्हाणे,युती तालुकाध्यक्ष किरण ताई, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, शहर सचिव निलेश भावसार, मांडळ गट अध्यक्ष श्यामकांत बडगुजर व मनसे सैनिक उपस्थित होते.
