संपादकीय विशेष बातमी…..
अमळनेर विधानसभेच्या निवडणुकी कडे राज्याचे लक्ष लागून आहे.राष्ट्रवादी चे दोन तुकडे झाल्याने अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांचां हात धरल्याने राजकीय भूकंप झाला होता.

अमळनेर विधानसभेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मंत्री अनिल पाटील हे निवडून आले होते.त्यांना तिकीट मिळावे म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आग्रही भूमिका घेतल्याने ते शक्य झाले होते.मात्र पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाडळसरे धरणाच्या प्रश्ना वरून पाच वर्षात दोघानी अनेकदा एकमेकांना चिमट्या घेतल्याने त्यांच्या संबंधांमध्ये अंतर पडले असल्याची चर्चा आहे.मात्र परत गेल्या काही दिवसापूर्वी धुळे व राहत्या घरी झालेल्या भेटीने चर्चेला उधाण आले.यामुळे साहेबराव पाटील यांच्या एकनिष्ठतेवर पुन्हा प्रश्न चिन्ह राष्ट्रवादीतील पुढाऱ्यांनी निर्माण केला.कारण या भेटी पूर्वी आपण तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत साहेबराव पाटील यांनी जळगांव येथे झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिती देऊन जाहीर केले.विरोधकांनी सुध्दा या मागणीवर प्रश्न निर्माण करीत साहेबराव पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागणे म्हणजे मंत्री अनिल पाटील यांना जिंकण्यासाठीचाच गुप्त अजंडा असल्याची गंभीर आरोप केले होते..

दरम्यान साहेबराव पाटील यांनी अमळनेर येथील राजगृह निवासावर लावलेली तुतारी काढून टाकली असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निष्ठावंत नेत्या सह शरद पवार यांना मानणाऱ्या लोकांन मध्ये नाराजीचा सुर उमटला.या बाबत स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या.याउपर वरिष्ठांनी स्थानिक निष्ठावंत यांना तयारी करण्याचे आदेश दिले.निवडणूक लढण्यास इच्छुक निष्ठवंतानी आदेशाचे पालन करीत आखा तालुका पिंजून घरा घरा पर्यंत तुतारी चिन्ह पोहचविले.राष्ट्रवादीचे पितामह शरद पवार साहेबांनी मध्यंतरी मंत्री अनिल पाटील पुढील काळात विधानसभेत दिसणार नाही,असे सूतोवाच केले असल्याने निष्ठावंत मतदार संघात जीवाचे रान करीत आहेत.असे असले तरी काही दिवसापूर्वी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षा कडे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या सोबतीने जाऊन पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.या घटनेमुळे निष्ठावंत कार्यकर्ते पुर्ते संतापलेले पाहायला मिळाले.
यासर्व घडामोडी कडे तालुक्यातील नागरिक लक्ष ठेवून आहेत.मात्र या कडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रमुख व्यक्तीं कसे बघतात ? त्यांचे याबाबत चे मत करडी नजर न्युज ने त्यांच्या कडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पुढील मत त्यांनी मांडलेली आहे.
सौ.तिलोत्तमा पाटील,सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस….

मा शरद पवार साहेबांवर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत असल्याने आघाडीला लोकसभेत भरभरून प्रतिसाद दिला.यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ही आघाडीला बहुमत मिळणार असल्याने राज्यातील अनेक पुढारी राष्ट्रवादी पक्षा कडे उमेदवारी मागत आहे.त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षा कडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र केवळ अर्ज दाखल केला म्हणून उमेदवारी मिळेलच असे नाही.पक्षश्रेष्ठी हे पक्षातीलाच योग्यता असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देतील.इतरांनी जनतेत भ्रम निर्माण करू नये.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
श्री उमेश पाटील,प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी ग्रंथालय सेल…

जो व्यक्ती कधीच एका पक्षात सातत्याने पाच वर्ष टिकत नाही अश्या व्यक्तीवर पक्षच काय तर जनता ही विश्वास ठेवणार नाही.स्वार्था साठी सन २०१९ ला भाजपात प्रवेश करणाऱ्या साहेबराव पाटील यांनी तुतारी चां फटका कधी गळ्यात टाकला का ? सध्या पक्षा तर्फे सर्वे चालू असल्याने आपले नाव पुढे करण्याचा केविलवाना प्रयत्न ते करीत आहेत. ते पक्षातच नसल्याने त्यांना तिकीट कसे मिळणार ? आम्ही आदरणीय शरद पवार साहेबां सोबत पक्ष फुटल्या नंतर ही निष्ठेने पक्षाचे काम करीत आहोत.मात्र वारंवार दलबदलू धोरण बाळगणाऱ्या साहेबराव पाटील हे भविष्यात शरद पवार साहेबांच्या सोबत राहतीलच यावी ग्यारंटी नाही.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
शिवश्री श्यामकुमार पाटील, शहर अध्यक्ष…

तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्याच जवळपास पाच ते सहा लोकांनी अमळनेर विधानसभेच्या उमेदवारीसाठी मागणी अर्ज केले आहेत.त्याच प्रमाणे साहेबराव पाटील यांनी सुध्दा मागणी अर्ज केला आहे.वरिष्ठांच्या निकक्षात बसेल त्याला उमेदवारी मिळेल आणि वरिष्ठ हे पक्षनिष्ठावंतांना उमेदवारी देतील याची आम्हाला खात्री आहे.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
श्री सचिन पाटील, तालुका अध्यक्ष…..

पक्षाच्या घटनेनुसार क्रियाशील सभासदच पक्षाची उमेदवारी अर्ज करू शकतो.स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे लोक अनिल पाटील मंत्री झाल्यानंतर नागरी सत्कार करण्यास जातातच कसे ? मागच्या विधानसभेला भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्यांना निष्ठावंत म्हणावे का ? हल्लीच पक्ष प्रवेश करणाऱ्यांनी पक्ष वाढी साठी असे कोणते कार्य केले,जेणे करून त्यांना निष्ठावंत म्हणता येईल ? साहेबराव पाटील यांनी जरी राजभवन या कार्यालयावर लावलेली तुतारी चिन्ह काढलेले असेल तरी आज ही त्यांच्या राजभवनात समोरच आदरणीय शरद पवार साहेबांचां फोटो लावलेला आहे.चिन्ह बदलत असतात मात्र व्यक्ती वरील निष्ठा ही कायम असते.साहेबराव पाटील यांची पहिल्या पासून मा. शरद पवार साहेबांवर निष्ठा आहे.पवार साहेबांनी जेव्हां जेव्हां निर्देश दिले त्यानुसार पक्षवाढी साठी काम केले आहे.त्यामुळे स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणाऱ्यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या आदेशावर निष्ठा ठेवून काम करावे.

Sachin patil yana mhanav market che sabhapti pad bhetl nahi tevha tumhi Anil dada sahebrao dada yani paise khalle asa araop karun baithakitun baher nighale …Sachin dada kuthe kuthe manange zale shed net ghotla he janta jante amalner chi tya mule tumche dhande kay Mumbait jaun 2 3 divs kartat kay tumhi sagl mahiti ahe jantela