अमळनेरमध्ये ‘आखाजी महोत्सव’ उत्साहात; पारंपरिक लोकसंस्कृतीचे संवर्धन ही काळाची गरज – राजेश पांडे

     अमळनेर: “खान्देशातील आखाजी महोत्सव हा केवळ सण नसून तो अहिराणी संस्कृतीचा आरसा आहे. आधुनिक काळातही गौराई, झोक्यावरची गाणी आणि जात्यावरील ओव्या या परंपरा जपून ठेवणे आवश्यक आहे. यावर्षीचा महोत्सव प्रचंड प्रतिसादात यशस्वी झाला असून, भविष्यात हा महोत्सव शासकीय स्तरावर मोठ्या स्वरूपात साजरा व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शासकीय निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.

      खान्देश साहित्य संघातर्फे अमळनेर येथील एल. आय. सी. कॉलनीत आयोजित ‘आखाजी महोत्सवाच्या’ उद्घाटन प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते.

अहिराणीची गोडी कायम – राजेश पांडे

     यावेळी राजेश पांडे यांनी भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेतून करत उपस्थितांची मने जिंकली. “मला अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली, तरीही अहिराणी भाषेची गोडी कमी झालेली नाही,” असे सांगत त्यांनी महिलांना ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

     याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी जपलेल्या परंपरांबद्दल अभिमान व्यक्त केला, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत अहिराणीतून फटकेबाजी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले, तर स्वागत स्वागताध्यक्ष तथा कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी केले.

विविध स्पर्धांचा निकाल

महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पारंपरिक स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निकाल खालीलप्रमाणे:

पुरणपोळी स्पर्धा: प्रथम – प्रतिभा चौधरी, द्वितीय – नयना पाटील, तृतीय – मंगल सोनवणे.

झोक्यावरची गाणी: प्रथम – मेघना पवार व दीपिका पाटील, द्वितीय – रेखा भागवत व पूजा अधिकारी.

उखाणे व वेशभूषा: प्रथम – विजयाताई पाटील, द्वितीय – पल्लवी पुरुषोत्तम पाटील.

आरास स्पर्धा: प्रथम – जिजाऊ ग्रुप, द्वितीय – स्वामी समर्थ ग्रुप.

जात्यावरील गाणी: प्रथम – रंजना महाजन व चित्रकला महाजन.

मान्यवरांची उपस्थिती

      या सोहळ्याला रमेश बोरसे, रत्नाताई पाटील, साहित्यिक कृष्णा पाटील, हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, डॉ. अविनाश जोशी, डॉ. डिगंबर महाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी केले, तर आभार उमेश काटे यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्थांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!