अमळनेर :जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री शिवाजी हायस्कूल तांबेपुरा येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत शिक्षण विभागाने चालविलेला छळ आता पराकोटीला पोहोचला आहे. तब्बल २५-२५ वर्षे निष्ठेने सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या सात महिन्यांचे वेतन पुन्हा एकदा रोखण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आणि वेतन अधीक्षक रियाज तडवी यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

