अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी राखीव झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांच्या स्वप्नाची धुळधान झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. कारण अनेकांना नगराध्यक्ष पदाचे चॉकलेट मिळालेले होते.आपल्याला भर भक्कम पाठींबा मिळणार म्हणून आशाबाळगून बसलेले होते मात्र दुसरी कडे सुंटी वाचून खोकला गेल्याने वचन देणाऱ्यांच्या मनात लाडू फुटत आहे, अशी चर्चा रंगताना दिसते.

अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत सदरची जागा ही अनुसूचित जमाती साठी सुटल्याने तालुक्यातील पक्षश्रेष्टी मध्ये उत्साह दिसून येत नाही.सदर पदासाठी कानाखालचा किंवा मम म्हणणारा उमेदवाराच्या शोधात नजरा फिरू लागल्याचे चित्र दिसत आहे . शिक्षित उमेदवार हा डोक्यावरचा असतो आणि तो आपण सांगू तसे ऐकणार नाही म्हणून शिक्षित उमेदवार नको चा पाढा वाचतांना हे दिग्गज राजकारणी दिसत आहे. अशिक्षित, हलक्याकांनाचा, गरीब दुबळा उमेदवार मिळतो कां, याचा कसोशीने शोध घेणे सुरु असल्याचे कळतं. मात्र दिग्गज राजकारण्यांच्या या घाणेरड्या विचारामुळे अंमळनेरचा विकास खुंटीला टांगून ठेवल्या शिवाय राहणार नाही. अश्या मुळे टक्केवारीचे राजकारण फोफावेल. नागरिकांना सोयी सुविधा पासून वंचीत रहावे लागेल. विकासाच्या नावा खाली मार्जितील तथा चाटूगिरी करणाऱ्यांना ठेके दिली जातील.जनतेच्या कराचा पैसा या माध्यमातून ओरबडला जाईल. याचे भान शहरातील मतदारांनी ठेवणे आवश्यक आहे.
असे जरी चित्र असले तरी प्रभागात मीच निवडून येईल या अविरभावात निवडणुकीच्या रींगनात येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.राजकीय पक्षामध्ये निवडणुकी संदर्भात हालचाली सुरू आहेत कोण कोणत्या पक्षामध्ये आणि कोण कुठून उभा राहील हे आज जरी कळत नसले तरी काही अति उत्साही डोक्याला बाशिंग बांधून तयार आहेत.याशिवाय काही मातब्बर नेते जे गेली अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणूक लढवीत आहेत. नगरपालिकेत त्यांचे राजकारण सुरू असते अशा लोकानां त्यांचाच जवळचे व्यक्ती प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेले दिसते.लोकांना बदल हवा म्हणून यावेळी मीच निवडून येणार व माझ्या माध्यमातूनच प्रभागाचा विकास होणार म्हणून ठासून सांगितले जात आहे.
शहरात मात्र चर्चा सुरु आहे की, या निवडणुकीत महायुती असो की महाआघाडी एकत्रित लढतात की स्वतःची ताकद दाखविण्यासाठी किंवा कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून स्वतंत्र लढणार, हे चित्र स्पष्ट नझाल्याने इच्छुक उमेदवार ही संभ्रमात असल्याचे दिसतात.कोण अपक्ष उभा राहील हे सांगणे आज कठीण झाले आहे.निवडणुकीचा गेम कसा लागेल कोण कसा लढेल,कोण कोणत्या पक्षातून लढेल हे सांगणे फार मोठे कठीण होऊन बसले आहे.
न पा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्यास भारतीय जनता पक्षाकडून कोण उभे राहते हा देखील मोठा विषय आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना,अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांची युती असल्याकारणाने साहजिकच शहरवासीयांना युतीच्या नगराध्यक्षाची अपेक्षा आहे परंतु या तिघांचीही जोड़े एकमेकांच्या पायात नसल्याकारणाने आज शहर व तालुक्याला या तिघांच्या उमेदवारांना एकमेकांच्या विरोधात लढताना बघायला मिळणार आहे.
याशिवाय माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्या समवेत प्रवेश केल्याने शिंदे पक्षाची ताकद वाढल्याने यांचे देखील या निवडणुकीत उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौरंगी लढत होते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण काँग्रेस पक्ष शहरातील आपली ताकद पाहता स्वतंत्र पणे आपले उमेदवार उभे करतील किंवा नाही,हे पाहणे उचित ठरेल.
