अमळनेर : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तत्काळ तिकिट बुकिंगची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी नियमांत मोठे बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे तिकिट बुकिंग अधिक सोपे होणार असून सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून तत्काळ तिकिट बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच सर्व तिकिटे संपत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. एजंट्स आणि बनावट अकाउंट्समुळे ही प्रक्रिया अधिक अडचणीची बनली होती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या नव्या नियमांमुळे या समस्यांवर आळा बसणार आहे.

